Tuesday, 28 April 2020

२०२१ च्या गोष्टी.

इसवी सन २०२१ च्या आसपास ची ही कथा.ही हर्षदराजे आणि त्यांचा मित्र मंगु धनवटे याची.हर्षदराजे जरी स्वतःला राजे उपाधी लावत असले तरी बाकीचे त्यांना सोन्या , हर्षा अशा नावाने हाक मारत मात्र गावातील वयोवृद्ध त्यांच्या घराण्याच्या आदरापोटी त्यांना सोनबाराजे म्हणत.दस्तुरखुद्द हर्षदराजे ज्यांना मंगु म्हणतात त्यांना सारा गाव मंग्या म्हणायचा अगदी त्याची माऊली सुद्धा! हर्षदराजे आणि मंगु ची जोडी अगदी जयवंत पाटील आणि दतु कोतवालांसारखी हे ही केवळ हर्षदराजेच म्हणत.
तर सगळ्यांचा मंग्या अगदी हर्षदराजे यांचाही तो मंग्याच. सर्वांचा लाडका. ज्यावेळची ही कथा आहे म्हणजे अजमासे ५७-५८ वर्षापुर्वी मंग्या हातासरशी ३-४ तालुक्यातील २०-२५ जणांचा जावई असेल इतका तो प्रेमशास्त्रपारंगत होता.त्यावेळी त्याला आलेली अनेक स्थळ त्यांनी या प्रकरणी धुडकावून लावली होती.असा वीर आमचा मंग्या होता.त्यावेळी एक फॅशन होती इलेक्शन आलं की सणवार मोठे साजरी करायची.त्यामुळ शेजारच्या गावात दहीहंडीच्या निमित्ताने तमाशा होता.आमचं निम्म गाव तिकडं तमाशाला  त्यात  आम्ही दोघेही आलोच. तमाशा सुरू होणारच होता तेव्हढ्यात त्यांची म्होरकी नर्तकी समोर आली नि म्हणली" आमच्या कॅसिओ वाल्याला चक्कर आलीय.तुमच्यात कुणाला कॅसिओ वाजवता येतो का ?" आमच्या मंग्यानी डायरेक्ट माझा हात धरला नि वर केला. माझी तारांबळ उडाली .मी ऐकत नाही म्हणल्यावर ती खाली येऊन माझ्या दिशेने चालु लागली .मी भवितव्याचा विचार करून गाडीला किक मारुन धुम ठोकली माझ्या जीवानं सुटकेचा निःश्वास सोडला,जणु ती येऊन माझ्या मांडीवरच बसणार होती.
असा त्या मंग्यामुळं माझा बीपी वाढुन मी जिवाला मुकलो असतो.
असेच चांगले मजेत दिवस चालले होते तेव्हढ्यात कोरोना नावाचा विषाणू आला नि साऱ्या जगाला घरात कोंडुन ठेवलं केवळ भारताचा ग्रामीण भाग सोडला तर कारण त्यावेळीसुद्धा काहीअंशी खेडी स्वयंपुर्ण होती.गावातल्या गरजा गावात भागत होत्या.उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळं आमचा पव्हायचा बजत ठरला.पण गावात मोजक्याच विहीरींना पाणी होतं कारण चासकमानच पाणी अजुन आलं नव्हतं.ज्या विहीरीवर गेलो तर या विहीरीचा मालक लै चक्सु होता कोरोनाची सगळी पथ्ये पाळायचा.त्यात त्याला सुगावा लागला होता की आपल्या विहीरीत पव्हायला पोरं आल्यात अन् त्यांना सर्दी खोकला पण झालाय. आम्ही पाण्यातच होतो तोच पव्हायला येत नसल्यामुळे आमची कपडे सांभाळणारा मंग्याकुणालख तरी हाक मारत होता पाहीलं तर विहीरीचा मालक होता. जवळ आल्याबरोबर त्यानी दगडी मारायला सुरुवात केली तसा मंग्या बुडाला पाय लाऊन पळाला आमच्या कपड्या सकट. त्या प्रकरणाची बातमी शिळी झाल्यावर आम्हाला कळलं की विहीरीच्या मालकाला व्हाॅट्स अप वर चहाडी करणारा मंग्याच होता.

अशीच एक कहाणी नंतर कधीतरी!

©सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख.

टीप : जो कुणी ही पोस्ट वाचून देखील लाईक करणार नाही त्याला...............

आमच्या संदीपमामाला विचारा.

Monday, 13 April 2020

आठवणीतले रावसाहेबदादा



रावसाहेब दादा बाबुराव  पवार. शिरूर तालुक्याचा पहिला भूमिपुत्र जो १९६२ साली तालुक्याचा आमदार झाला.  त्यांच्या देखण्या रूपाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आजच्या घडीला टॉल्लिवूड च्या कुठल्याही अभिनेत्याला लाजवेल असा रांगडा मर्द गडी. सदरा,धोतर टोपी अन पिळदार मिश्या असा त्यांचा पोशाख .स्वभावात माधुर्य एवढं की प्रत्येक मित्राला, पाहुण्याला अस वाटणार की दादा फक्त आपल्याशीच अगदी मनमोकळे होऊन बोलतात. 

पोलिस खात्यात नोकरी करून तालुक्याचा आमदार होताना आणि त्यानंतरही सहकाराच जाळं विणलं.पंचायत समिती सारख्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा बाजार समिती सारख्या सहकारी संस्था असोत दादा त्या संस्थांचे बळकटकरणासाठी अग्रेसर होते. त्यातूनच शिरूर तालुका खरेदी विक्री संघाची स्थापना दादांनी केली. एव्हढंच न्हवे तर आज रोजी तालुक्याचा राजकीय केंद्रबिंदू असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना याची स्थापना करण्यात दादांचाच पुढाकार होता. ते स्वतः फक्त आमदार होऊन थांबले नाहीत तर आपल्या तालमीत वाढलेले पोपटराव कोकरे व पोपटराव  गावडे यांना देखील आमदार बनवलं. एवढं मोठं आणि अचाट त्यांचं कर्तृत्व.त्यांचं कर्तृत्व आणि नेतृत्व सिध्द करणारी घटना स्वातंत्र्यानंतर घडली.

कोरोना सारख्या विषाणू मुळं आपत्ती काय असते हे माझ्या वयाच्या पोरांनी पहिल्यांदाच पाहिलं.पण याआधी नैसर्गिक आपत्ती येत होत्या.अशीच एक आपत्ती शिरूर तालुक्याची जीवनदायिनी असणाऱ्या भिमा नदीमुळे आजुबाजुच्या प्रदेशावर आली होती.बहुतांशी लोकांना वाटत की पुर म्हणजे १९६२ पण नाही त्या आधी ६ वर्ष म्हणजे १९५६ साली भीमा नदीवर महाभयंकर पुर आला होता त्याच नाव महापाणी त्याबद्दल आज अनेक जण अनभिज्ञ आहेत.पानशेत घटनेपेक्षा त्याची तीव्रता कितीतरी अधिक होती. हे आपल्याला पुढील घटनांवरून लक्षात येईल.आज बागायती आणि ऐश्वर्यसंपन्न दिसणारी नागरगाव, वडगाव, मांडवगण सारखी गाव कित्येक पिढ्या मागं गेली.नागरगाव संपुर्ण पाण्याखाली जाऊन नवीन गाव वसवलं. वडगाव ते मांडवगण लोक होडीने प्रवास करत होते. ऐकुन अतिशयोक्ती वाटेल पण सत्य आहे.एव्हढी भीषण तीव्रता त्या प्रलयाची होती.त्याचा सर्वात जास्त धोका दौंड तालुक्यातील हातवळण गावाला होता.त्याच वेळी चाळीशीतील एक व्यक्ती समोर आली. या प्रलयाची चाहुल लागताच त्यांनी हातवळण गाव स्थलांतरित केलं.आणि फार मोठा  अनर्थ टाळला.त्या व्यक्तीचं नाव होत रावसाहेब बाबुराव पवार. दादांचं हजरजबाबी व्यक्तीमत्वाची झलक त्यांच्या कर्तृत्वातून दिसून येते.त्यांना आपत्ती व्यवस्थापण क्षेत्रातील दादा म्हणण्यास सुद्धा हरकत नसावी.अशा अनेक घटना दादांच्या आयुष्यात घडल्या असतील पण मला माहित असलेली ही एक.

धन्यवाद.

✍️सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख 
#क्षत्रियबाणा

हांडे देशमुखांच्या शोधात

मला जसं जसं कळु लागलं तसं तसं माझे आजोबा कै. दादाराव हे मला आमच्या घराण्याविषयी ,घराण्यातील चालीरितींविषयी माहिती देत असायचे. गावातील मंडळी ...