पाटीलकी.....
राजेभोसले घराण्याने सुद्धा छत्रपती झाल्यानंतर देखील अभिमानानं चालवलेलं वतन,यावरूनच आपल्याला पाटील या शब्दाचा आवाका लक्षात येतो आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणात देखील महाराष्ट्रात विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर सुद्धा पाटलांचीच ‘दादा’गिरी असल्याचे लक्षात येते.महादजी बाबा शिंदे पाटील अलिजाबहाद्दर यांना 'हिंदुस्थानचे पाटील' म्हणून गौरवण्यात येते. .इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनांमधून पाटील या शब्दाची जादू दाखवून देतात एवढा हा आपल्या समाजातील जिव्हाळयाचा शब्द. समाजमाध्यमांवर आणि लग्नपत्रिकेत पाटील शब्दाचीच रेलचेल दिसून येते . आज देखील प्रत्येक जण स्वतःला पाटील म्हणून घेऊ इच्छितो .कारण पाटील या शब्दाला इतिहासच फार मोठा आहे .सरकार आणि सामान्य रयतेमधील दुआ म्हणजे पाटील . गावाच्या मिरासदारांपैकी प्रमुख अथवा वरिष्ठ घराण्याला पाटीलकीचा बहुमान मिळत असे . काही गावांमध्ये एक पेक्षा अधिक पाटीलकीच्या तक्षिमा असत तेव्हा पाटीलकीच्या मानाच्या वाटण्या होत असत.होळीची पोळी,पोळ्याचा बैल , लग्नाची वाटी ,मांडव टिळा ,दसऱ्याचा मान ,पासोडी ,राबता महार, चांभाराकडून जोडे,तेल्याकडून तेल, देवाकडे बकरे पडतात त्याची मुंढी अशा प्रकारचे मान गावाच्या पाटलांना असत ,प्रत्येक गावानुसार पाटलाचा मानपानात थोडा फार फरक होत असे. मौजे रांजणगाव सांडस तर्फ कर्डे ,येथे रणदिवे पाटील बंधूंमध्ये पाटीलकीच्या वडिलपणावरून वाद होऊन थेट पेशव्याच्या दरबारात गेल्याचे आपल्याला पाहायला मिळते. यात आपली सत्यता सिद्ध करण्यासाठी दिव्य करावे लागले होते . अनेक मजहरांमध्ये अनेकदा साक्षीदार म्हणून विविध गावाचे पाटील व कुलकर्णी आपल्याला पाहायला मिळतात. त्यात पाटलाची निशाणी नांगर असल्याचे आपल्याला दिसते. इंग्रजी अंमल सुरु झाल्यापासून पाटीलकीच्या कामात विभागणी होऊन पाटलांचे दोन प्रकार झाल्याचे आपल्याला दिसते १ मुलकी पाटील २ कामगार पाटील .कामगार पाटलालाच पुढे पोलीस पाटील म्हंटले गेले आहे.
आमच्या मौजे आंबळे गावात पाटीलकीच्या दोन तक्षिमा होत्या १ बेंद्रे पाटील २ निंबाळकर पाटील . यातले राजेनिंबाळकर पाटील हे शिवपूर्वकाळापासून पाटीलकी करत होते. बेंद्रे पाटलाअगोदर घुमरे पाटील मौजे आंबळे गावाचे निम्मे मुकादम होते . पण १९व्या शतकाच्या उत्तरार्धात इतिहासाला आजही अपरिचित असलेल्या आंबल्यातील राजे निंबाळकर घराण्याच्या वंशाला दिवा राहिला नाही. म्हणून त्यांच्या घरातील एका जुन्या स्त्रीने त्यांच्याच भावकीतील कोल्हापूरच्या सरलष्कर निंबाळकर खर्डेकरांचे नजीकचे भाऊबंद असलेले मौजे दानोळीच्या बाळासाहेब निंबाळकर खर्डेकर यांना पाचारण केले.बाळासाहेब त्यावेळेस हयात न्हवते मात्र त्यांची तीन मूलं कृष्णराव , गणपतराव ,दत्तोबा हे तीन बंधू आंबाळ्याला आले.वडीलपणामुळं थोरले कृष्णराव यांच्याकडं पाटिलकीची जबाबदारी आली .त्यांच अल्पावधीतच निधन झाल्यामुळं मधले बंधु गणपतराव पाटील झाले ,पुढे गणपतराव निवर्तल्यानंतर सर्वात धाकटे दत्तोबा पाटील पाटीलकी करू लागले. दत्तोबा पाटील यांनी सत्यशोधक समाजाला आपलंस केले अन् गावोगावी ‘जलसा’करत असत (गणपतराव पाटलांच निधन झाल्यानंतर;जयवंतराव पाटील लहान आहेत त्यामुळं तुम्ही पाटीलकी करा अशा आशयाच पत्र थेट कलेक्टरं नच दत्तोबा पाटलांना पाठवलं होत,आजही ते उपलब्ध आहे.ही गोष्ट १९२० सालची आहे).जयवंतराव वयात आल्यानंतर ते पाटील झाले.आणि तिथुन पुढे सुरू झाला निंबाळकर पाटलांचा सुवर्णकाळ !दरारा म्हणजे काय असतो ते त्यांना बघुन कळतं'पाटील म्हणजे एक घाव अन् 100 तुकड' हे वाक्य ज्यांना तंतोतंत लागु होतं ते जयवंतराव पाटील निंबाळकर (पाटीलदादा) न्हावरे, आंबळे आणि कर्डे गावचे पाटील राहिलेले व संपुर्ण तालुक्यात पाटील म्हणल की ज्यांच नाव येत ते पाटील दादा. त्यांची जीवनगाथा माझ्या मित्रांना आख्यायिका किंवा दंतकथा वाटतात एव्हढी ती अविश्वसनिय आहे.लोकांना त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती होती,पाटीलदादा दिसले की लोक बाजुला पळुन जात म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.स्त्रिया त्यांना पाहून आपली वाट बदलीत.त्यांचे तीनही चुलतबंधु त्याच तोडीचे माझे गुरू .दादासाहेब निंबाळकरांनी तर आदर्श जीवनाची ओळख करून दिली.त्यांचे धाकटे बंधु शंकरराव हे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.पाटील दादांची दोन्ही मुलं गावची सरपंच राहिली थोरले श्री .विजयकुमार (बाळपाटील)यांनी गावातील सरपंच,सोसायटीचे चेअरमन नि पोलीस पाटील अशा सर्व पदांवर काम केलं.आज त्यांची चौथी पिढी समाजकारणात आहे गावानेही त्यांना त्याच आपुलकीनं स्विकारलय.हे विशेष!
शिवपुर्वकाळापासुन ते आतापर्यंत महाराष्ट्रात फार थोडी करावी असतील ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जीवावर समाजात आपलं मानाचं पान राखलय त्या सर्व घराण्यांना मानाचा मुजरा !!
कृपा लोभ असो दीजे ही विनंती
No comments:
Post a Comment