Tuesday, 5 November 2019

कार्यसम्राट सरपंच

 

सन १९६२ साली वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था अस्तित्वात आली .त्याचा मुख्य हेतु होता सत्तेचे विकेंद्रीकरण.त्याला अपयश आले असे म्हणता येणार नाही,विविधांगी स्वरूपातुन महाराष्ट्राच नेतृत्व याच पायऱ्या चढुन आल्याच आपल्याला दिसतं.ग्रामीण नेत्यांनी  शहरी लोकांना देखील भुरळ पाडली .यात ग्रामपंचायत आणि त्या माध्यमातुन होणारा  विकास देखील महत्वपुर्ण ठरतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात तर सरपंच आणि त्याच्या अधिकारात अमुलाग्र बदल झाले.पंचायत समितीचा निधी कमी करून  तो निधी थेट ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे

शिक्षणाने व आधुनिकतेने प्रेरित झालेले तरूण यात सहभागी होताना दिसतात ही फार मोठी समाधानाची बाब आहे.त्याचाच प्रत्यय मला आमच्या नळावणे गावात आला जुन्नर तालुक्यातील ईशान्य भागात वसलेले नळवणे म्हणजे निजामशाही काळापासुन जुन्नर प्रांताचे देशमुख असलेले हांडे देशमुखांच मुळ गाव .नळवणे गाव हे नळवणे पठार म्हणुन जुन्नर तालुक्यात फार प्रसिद्ध आहे .कुलस्वामी श्री मार्तंड भैरवाचा वास त्या नळवणे गावाला लाभलेला आहे.जुन्नर तालुक्यात ५ धरणांचा कुकडी प्रकल्प असुनही नळावण्याला दुष्काळाचा सामना करावा लागत होता.तीर्थक्षेत्र असुनही गावाला जोडणारे रस्ते मात्र नाममात्र शिल्लक होते.पण २०१५ साली एक इंजिनीअर तरूण पुण्यातील मासिक ७०,००० पगाराची नोकरी सोडुन गावात येतो काय अन् गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गेली २५ वर्ष राजकारणात मातब्बर असणाऱ्या व्यक्तीला निवडणुकीच्या आखाड्यात चितपट करतो काय !!हा सगळा चमत्कार करतो काय !!हा चमत्कार करणाऱ्याच नाव आहे श्री.तुषार तान्हाजी देशमुख आजचा तिशीतला तरूण वयाच्या २७ व्या वर्षी गावचा सरपंच झाला अन् गावचा चेहरामोहरा बदलला.

तुषार दादा उच्चशिक्षित अन् वयाने तरूण असल्यामुळ तरूणांचा त्यांच्यावर फार लोभ असल्याचे मला जाणवलं. आपल्या मधुरवाणीचा उपयोग करून अगदी मुख्यमंत्र्यापर्यंत भेटीचा मजल मारली व गावासाठी निधी उपलब्ध केला.गेल्या ४ वर्षात तब्बल ७ कोटींचा निधी त्यांनी उपलब्ध केलाय .आज गावात जाण्यासाठी मुख्य रस्त्याला जोडणारा डांबरी रस्ता झालाय ,वाड्या वस्त्या देखील पक्क्या रस्त्यानी जोडल्या गेलेल्या आपल्याला दिसतात याचं श्रेय फक्त तुषार दादांना जातं.गावात पावसाळ्याचे ४ महिने सोडले की पाण्याची वाणवा भासायची ,दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण व्हायची.पण गावात उत्कृष्टरित्या पाणीपुरवठा योजना राबवत गावातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा तुषार दादांनी खाली उतरवला आणि मायमाऊलींच वात्सल्यरूपी प्रेम मिळवण्यात यश प्राप्त केल.

तुषार दादांच्या कार्याची दखल अनेक वर्तमान पत्रांनी देखील घेतली आहे.लोकमत वृत्तसमुहाचा आदर्श सरपंच पुरस्कार देखील तुषारदादांनी पटकवला आहे .त्यांच्याबरोबरच नळवणे गावच व संपुर्ण हांडे देशमुख परिवाराच नाव त्यांनी उज्वल केलं आहे.त्यांनी याच प्रकारे गावच व आपल्या घराण्याच नाव उज्वल कराव ही श्री मार्तंड चरणी प्रार्थना करतो.

आपलाच 
हर्षद रमेश हांडे देशमुख 
कसबे कर्डे ता.शिरूर जि.पुणे

No comments:

Post a Comment

हांडे देशमुखांच्या शोधात

मला जसं जसं कळु लागलं तसं तसं माझे आजोबा कै. दादाराव हे मला आमच्या घराण्याविषयी ,घराण्यातील चालीरितींविषयी माहिती देत असायचे. गावातील मंडळी ...