#खालील_चित्रात_दिसणारी_गदा_साधीसुधी_नाही
गदा म्हंल की आपल्यासमोर येतो तो राभभक्त हनुमान आणि महाबली भीम अर्थात गदा म्हणजे ताकदीचं चिन्ह.कुस्ती क्षेत्रात गदेला फार महत्व आहे.आज वेगवेगळ्या स्पर्धांमधल्या गदा फार मानाच्या समजल्या जातात.
खालील फोटोत दिसणारी गदा देखिल अशीच मानाची गदा आहे.पुर्वी आंबेगाव तालुक्यातील अवसरी या गावात आखाड्यात ही गदा बक्षीस म्हणुन ठेवली जात होती.पण तीला जिंकणं फार अवघड होत कारण तीला जिंकण्यासाठी अट फार अवघड होती.ती अशी की जो पहिलवान सलग तीन वर्ष निकाली कुस्ती करील तो ती गदा जिंकणार होता.परंतु गेली ५० वर्ष ती गदा अजिंक्य होती.
एक दिवस असा आला की सलग दोन वर्ष एक पैलवान निकाली कुस्ती केली होती तोच गदा नेणार अशी चर्चा होती.पण त्याच वर्षी आंबळ्याच्या पैलवानांचा चमु अवसरीत आला होता आणि आंबळेकरांना अशीच संधी हवी होती.आतापर्यंत आंबळ्यात कुणी गदा आणली न्हवती कारण दुष्काळी परिस्थिती होती लोकांना आणि पैलवानांना सुद्धा मानपानापेक्षा पोटापाण्याचा प्रश्न महत्वाचा होता.पण यंदा गदा जिंकण्यासाठी सुवर्ण संधी चालून आली होती.
आंबळे करांनी शिवाजी पवार नावाच्या पैलवानाला उतरवण्याचा निर्णय घेतला आणि गेली दोन वर्षे सलग जिंकणाऱ्या पैलवानाला चितपट केलं.दुसऱ्या वर्षी परत आखाडा भरला पुन्हा एकदा शिवाजी पवारांनी कुस्ती निकाली केली.आता गावकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या मात्र शिवाजी पवारांची आर्थिक परिस्थिती ढासळली होती त्यात लग्न झालं होत म्हणुन उदरनिर्वाहासाठी गाव सोडलं होत पण त्यांचे बंधु संभाजी पवार यांनी प्रयत्न करून परत गावात आणलं ,शेवटचे दोन महिने राहिले असताना परत तयारी केली आणि सलग तिसऱ्या वर्षी कुस्ती निकाली केली.५० वर्षांचा इतिहास बदलला ,शिवाजी पवार इतिहासकर्ते झाले आणि त्यांनी आंबळे गावासाठी पहिली गदा आणली.आणि त्यांनी ती स्वत: साठी न ठेवता श्री नाथसाहेब चरणी अर्पण केली कारण त्यांनी देवाला सांगितलं होत की जर मी गदा जिंकली तर तुझ्या चरणी अर्पण करील.दरवर्षी जेव्हा छबिना निघायचा त्यावेळेस श्री नाथसाहेबांबरोबरच या गदेची देखिल ग्रामप्रदक्षिणा होत असे.
✍️सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख.
#पैलवानांच_आंबळे
No comments:
Post a Comment